राज्यघटना प्रास्ताविक

आम्ही, भारताचे लोक,

भारताचे एक सार्वभौम

समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य

घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास; सामाजिक, आर्थिक

व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व

उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता;

निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये

व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता

यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा

संकल्पपुर्वक निर्धार करुन; आमच्या संविधान

सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर

 1949 रोजी याद्वारे हे संविधान

अंगीकृत आणि अधिनियनित

करुन स्वत:प्रत अर्पण

करत आहोत.

मागे:कृतिकार्यक्रम