राज्यघटना प्रास्ताविक
आम्ही, भारताचे लोक,
भारताचे एक सार्वभौम
समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य
घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास; सामाजिक, आर्थिक
व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व
उपासना यांचे स्वातंत्र्य; दर्जाची व संधीची समानता;
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये
व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता
यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा
संकल्पपुर्वक निर्धार करुन; आमच्या संविधान
सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर
1949 रोजी याद्वारे हे संविधान
अंगीकृत आणि अधिनियनित
करुन स्वत:प्रत अर्पण
करत आहोत.